नटरंग - एक उत्तम चित्रपट.
पण दुर्दैवाने मराठी चित्रपटांच्या इतिहासात एक मानाचं स्थान थोडक्यासाठी हुकलं. चित्रपट संपल्यावर हिच हुरहुर वाटत रहाते. ध्येयासाठी जगणं पणाला लावणा-या एका बेडर मनाची गोष्ट मनाला भिडुन जाते. पण काळजात घर करत नाहि. मला असं वाटतं कि चित्रपट अजुन थोडा जास्त लांबीचा असता तरि बिघडलं नसतं. गुणा कागलकरचा दैन्यावस्थेपासुन वैभवाच्या शिखराकडे पोहोचण्याचा संघर्ष जेवढा प्रभावी होतो तेवढा मातीमोल अवस्थेपासुन परत कलामहर्षी होण्याचा प्रवास नुसताच दिसतो. एक गोष्ट उघड आहे ती म्हणजे बायको, मुलगा, नव्हे तर सगळे साथीदार हि सोडुन गेलेत, स्वता:ची ओळख एक फालक्या म्हणुन शिल्लक उरली आहे, म्हणायला एक नैना फक्त बरोबरिला आहे, या पासुन पुढची यात्रा हि तेव्हढीच अतीव कष्टाची आहे. ती दिसतच नाहि.
तरि अमराठी लोकांना अभिमानाने सांगता येइल असा चित्रपट केला याबद्दल श्री.रवी जाधव, आणी त्यांचे सगळे सहकारि मोठ्या यशाचे मानकरि ठरतील यात किंतु नाही.
Tuesday, January 19, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment